Tukaram Maharaj Beej - 2024 / तुकाराम महाराज बीज - २०२४

Tukaram Maharaj Beej 2024

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमनाचा दिवस.’ फाल्गुन वद्येला तुकारामांचे सदेह वैंठ-गमन झाले. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी तुकाराम बीज २७ मार्च २०२४ रोजी साजरा केला जाईल. तुकाराम बीज चा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी एकत्र येतात.

‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो.
Tukaram Maharaj Beej - 2024

Sant Tukaram Maharaj

आजही हलते झाड :  (नंददुरकी वृक्ष)

तुकाराम महाराजांनी देहूच वैकुंठगमन केले. देव तुकाराम महाराजांच्या मंदिरातील हा एक झाड आहे तोच नंददुरकी वृक्ष. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठा गेले, तेच हे झाड. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर १२:०२ ठीक आहे, ज्यामध्ये तुकोबाराया वैकुंठा गेला, तो प्रत्यक्ष हलतो. 

Tukaram Maharaj Beej – 2024

काय आहे पौराणिक कथा :

            संत तुराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांसाठी परखड भाष्य करताना विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान. त्यांची अगाध भक्ती अंतिम विठ्ठलाही तुकोबा दर्शन देणप्राप्ती क्रमप्राप्त आहे. मात्र फक्त दर्शनाने माझा तृष्णा भागणार नाही तर तुझी चरणी कायमची अशी विनंती तुराम महाराजांनी विठ्ठलाची चरणी केली होती. त्या विनंतीला मानाने तुम्ही श्रीकृष्णांनी वाहन चालवा, गरुडाला देहू इथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या नियमात कीर्जतन करताना तुकोबाराय अमुचा रामराम घ्या असं नाही ,देह वैकुंठाला निघाले.

कसे जायचे –

 
या वर्षी तुकाराम बीजनिमित्त देहूसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. २६ ते २८ मार्च दरम्यान देहूगावासाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले असून, तेथून जादा बसेस सुटणार आहेत. देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरिता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.

 
Tukaram Maharaj Beej – 2024 – येथून सुटणार जादा बस
  1. स्वारगेट ते देहूगाव
  2. मनपा भवन ते देहूगाव
  3. मनपा भवन ते आळंदी
  4. स्वारगेट ते आळंदी
  5. हडपसर ते आळंदी
  6. पुणे स्टेशन ते देहूगाव
  7. निगडी ते देहूगाव
  8. देहूगाव ते आळंदी

Tukaram Maharaj Beej – 2024 – देहू

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते अशी धारणा आहे.

सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती.

”ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे.”

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत.

देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो.
इंद्रायणी काठी गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे.

प्रेक्षणीय स्थळे

गावातील आणि गावाजवळील काही ठीकणे

  1. भंडारा डोंगर
  2. भामचंद्र डोंगर
  3. घोरर्डेश्र्वर डोंगर
  4. गाथामंदिर
  5. प्राचीन शिवमंदिर
  6. वैकुंठ गमन
  7. माश्याचा डोह
error: Content is protected !!
Scroll to Top